महाराष्ट्र 14 न्यूज : दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तर दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान, इयत्ता बारावी परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या, दहावी आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी ११ वाजता ऐवजी १०.३० वाजता सुरू होणार आहेत. मुलांचा यावर्षी लेखन सराव कमी झाल्यामुळे परीक्षेसाठी जादा अर्धा तास वेळ देण्यात येणार आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना जादा एक तास वेळ देण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात येणार आहेत. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा असाईनमेंट पद्धतीने होणार आहे.
परीक्षा केंद्र हे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच असणार आहे. विद्यार्थ्याला कोरोना झाला असल्यास अथवा लॉकडाऊनमुळे परीक्षा देता न आलेल्यांची जून महिन्यात विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. तर पुरवणी पराक्षा जुलै- ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान, इयत्ता बारावी परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…