Categories: Uncategorized

या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात … पहा, फक्त ११ दिवसांत किती लोकांना झाला आजार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ ऑगस्ट) : राज्यात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फक्त ११ दिवसांत १ लाख जणांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. १० ते २० ऑगस्ट या ११ दिवसांत राज्यात १ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना डोळे आले आहेत. या आजाराच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये मागील ११ दिवसांत ९७८८ डोळे आले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून संसर्गाच्या आजाराची साथ सुरु आहे. सर्वत्र सुरु असलेल्या या साथीपासून लहान मुले सुटलेली नाही. हा आजार संसर्गाच्या असल्यामुळे मुलांना शाळांमधून सक्तीची सुटी घ्यावी लागत आहे.

संसर्गाची मुले शाळेत आल्यास त्यांना घरी पाठवले जात आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात फक्त ११ दिवसांत १ लाख जणांना हा संसर्ग झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

पुणे शहरानंतर अमरावतीमध्ये ६,७२४, जळगावमध्ये ५,९३०, नांदेड ५,५४८, चंद्रपूर ५,२९२, परभणी ४,६२० इतके रुग्ण सापडले आहे. या आजाराचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.▶️आजारावर काय आहे उपाय :-

डोळे येणे आजार आल्यास घाबरून जाऊ नये. हा औषधांशिवाय बरा होता. त्यासाठी दिवसांतून पाच ते सहा वेळा डोळ्यांवर पाणी मारुन स्वच्छ करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त आठवड्याभरात हा आजार बरा होतो. डोळे आल्यावर इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून गॉगल वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीचा रुमाल, टावेल वापरु नये, डोळ्यांना सारखा हात लावू नये, हे उपाय डॉक्टरांनी सुचवले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

१५० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ५७ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध : अशी करा नोंदणी

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३१ जुलै २०२५ :* महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील १९ जानेवारी २०२१…

10 hours ago

आरोग्यासाथी : सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय

सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै -- आपण…

10 hours ago

अस्तित्वाच्या लढाईसाठी इच्छुकांचे लोटांगण … पण जनतेचा प्रश्न …आपण, साडेतीन वर्ष कुठे होतात??

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात सरकार स्थापन होवून सहा महिने होत…

10 hours ago

️ पुणे–पिंपरी चिंचवडकरांनो, ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ टॉपच्या घडामोडी नक्की वाचा!

️ पुणे--पिंपरी चिंचवडकरांनो, महाराष्ट्र14 न्यूज टॉपच्या घडामोडी नक्की वाचा! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :--…

12 hours ago

पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार शंकर जगताप यांची जलसंपदा मंत्र्यांकडे लेखी मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, ३० जुलै – पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या रावेत…

12 hours ago