Categories: Editor Choice

आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या “राज्यात कोरोना महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांच्या… ‘वात्सल्य योजने’ला  शासनाचा सकारात्मक प्रतिसाद .

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९जुलै) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत . अशी अनेक मुले आहेत , ज्यांनी या महासाथीमुळे आपले आई – वडील गमावले आहेत . लहान मुले म्हणजे देशाच् भविष्य आहे. या कुटुंबातील लहान मुलांच्या डोक्यावरील छत्र हरविल्याने सदर उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना सामाजिक दायित्व म्हणून सरकारने आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे .

कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनाथ झालेल्या लहान मुलांना शासनाने ‘ वात्सल्य योजने ‘ अंतगर्त मोफत शिक्षण व वयाच्या १८ वर्षापर्यंत दरमहा पाच हजार रुपये आर्थिक मदत करणे गरजेचे आहे . जेणेकरून अशा अनाथ मुलांचे जगणे सुसाह्य होईल व जीवनास उभारी मिळेल .

वात्सल्य योजनेंतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील अनाथ मुलांना मोफत शिक्षण व आर्थिक मदत देण्याबाबत शासन स्तरावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना योग्य ते कार्यवाहीचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिनांक १५ मे २०२१ रोजी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती.

त्याबाबत शासनाने दिनांक २३.०७.२०२१ रोजी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसे पत्र यशोमती ठाकूर , मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मागणीची दखल घेतली असून तसे पत्र पाठवून कळविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की कोविड -१९ या रोगाच्या पार्श्वभुमीवर या कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मुलांना त्यांच्या भविष्याचा विचार करता रु .५ लक्ष पर्यंतची मुदत ठेव बाबत महिला व बाल विकास विभाग , शासन निर्णय दि . १७ जून , २०२१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे . तसेच बाल संगोपन योजनेंर्गत दरमहा रु . ११०० / – इतके अथसहाय्य अनुज्ञेय असेल ,

तसेच कोविड १९- या रोगाच्या पार्श्वभुमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी व या कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दि . ०७.०५.२०२१ अन्वये जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्यात आला आहे . असे कळविण्यात आले आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

9 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

13 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago