Categories: Uncategorized

मराठा आरक्षण : मनोज जरांगे मुंबईला रवाना, महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये … ५४ लाख मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र मिळणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जानेवारी) : मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्यांसाठी दोन वेळा आमरण उपोषण केलं.

त्यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ देखील दिला. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या काही मागण्या सरकारने मान्य देखील केल्या आहेत. याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्नदेखील सुरु आहेत. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 20 जानेवारीपर्यंतची वेळ दिली होती. सरकारने 20 जानेवारीपर्यंत सर्व मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी त्यांची मागणी होती.

पण ते शक्य न झाल्याने आता मनोज जरांगे मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे आज त्यांच्या जालन्यातील अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला रवाना झाले. यावेळी ते प्रचंड भावूक झाले होते. आता आरपारची लढाई आहे. आपल्या छातीवर गोळ्या जरी झाडल्या तरी आता आपण आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही, अशी शपथ जरांगे यांनी घेतली आहे.

मनोज जरांगे यांच्या या भूमिकेनंतर आता शासन पातळीवर देखील प्रचंड हालचाली वाढल्या आहेत. महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर आज दुपारी तीन वाजता सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातली इत्यंभूत माहिती मुख्यमंत्री जाणून घेणार आहेत. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना जरांगे पाटील घेत असलेली भूमिका ही टोकाची असल्याचं सरकारचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनोज जरांगे यांनी मुंबईला आंदोलनासाठी येऊ नये यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दोन-तीन दिवसांपासून सातत्याने जरांगे यांनी भेट घेत आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे जरांगे यांनी काल बच्चू कडू यांच्याकडे अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या चुका, निष्काळजीपणा याची तक्रार केली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी जरांगे यांच्यासमोर अधिकाऱ्यांना झापलं होतं. मनोज जरांगे यांनी मूंबईत येऊ नये यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचा आदेश जारी केला होता. मराठा समाजाच्या ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्या सर्वांना कुणबी प्रमाणपत्र युद्ध पातळीवर देण्याचे आदेश मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. यासाठी जागोजागी मोठमोठे शिबिर आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम जलकुंडाची सोय

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी : दि. २६ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सवाची तयारी सध्या जल्लोषात सुरू असून…

3 hours ago

अतिरिक्त आयुक्तांनी विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांचा प्रभागनिहाय घेतला आढावा … पिंपरी चिंचवड महापालिकेची गणेशोत्सवपूर्व तयारी वेगात

महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. २६ ऑगस्ट २०२५ :* गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त…

5 hours ago

जीवघेण्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा नवी सांगवीतील नागरिकांची मागणी … कुत्र्याच्या चाव्याने महिला ICU मध्ये

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 ऑगस्ट :- कुत्रे पाठीमागे लागल्यामुळे नवी सांगवीतील एक महिला गाडीवरून…

14 hours ago

पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी … आता पिंपरी चिंचवड खेळाडूंचीही नगरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25ऑगस्ट :-- पिंपरी चिंचवडचा प्रयोद रजपूत बेस्ट बॉक्सरचा मानकरी ठरला आहे. पिंपरी…

15 hours ago

काम न करणाऱ्यांचेच फ्लेक्स जास्त असतात, म्हणत अजित पवारांचा पिंपरी चिंचवडकरांना इशारा… ज्याचे फ्लेक्स जास्त त्याचं बटन दाबू नका,

अजित पवारांनी आज चौफेर फटकेबाजी केली. मी बीडचा पालकमंत्री आहे. तिथले नागरिक म्हणतात तुम्ही अधून-…

24 hours ago

ध्वजपताका दिनांक १५ ऑक्टोबर पर्यंत पावसाळी वातावरणामुळे उतरविण्याचा महानगरपालिकेचा निर्णय..

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ ऑगस्ट २०२५ : चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज…

1 day ago