Categories: Uncategorized

जरांगे पाटलांच्या समर्थनाची मागणी करत, भुजबळांच्या भूमिकेवरुन अजितदादा गटात दुफळी, जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ नोव्हेंबर) : मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी या मागणीला विरोध केला आहे. मात्र, मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनच राष्ट्रवादीतच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.

आम्ही भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नसून राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजेत, अशी भूमिका पक्षाचे उपाध्यक्ष उदय आहेर यांनी मांडली आहे. तसंच हीच पक्षाची भूमिका असल्याचंही पक्षाध्यक्ष अजित पवारांनी अधिकृतपणे जाहिर करावी, अशी विनंती आम्ही अजितदादांकडे करणार असल्याचंही आहेर म्हणालेत. आज पुण्यात राष्ट्रवादीतील कुणबी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सरकारने जरांगे यांना दिलेलं आश्वासन हीच पक्षाची भूमिका असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भुजबळ जे भूमिका मांडताहेत ती त्यांची व्यक्तिगत भूमिका असल्याचा सूरही या बैठकीत लावला गेला.

अंबड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, “मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा जरांगेंना भुजबळांनी टोला लगावला आहे. आमची सुद्धा लेकरं आहे, तुम्ही वेगळ आरक्षण घ्या, असे भुजबळ म्हणाले.

जरांगे पाटील म्हणाले, की या एल्गारासाठी तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली, कशाचा आधार घेऊन गेली ते सांगा, ज्यांना ज्यांना आरक्षण कळालं तेच आरक्षणात गेले, आपल्याला आरक्षण कळायला 70 वर्षे गेले. जेव्हा कळालं तेव्हा मराठ्यांची त्सुनामी झाली. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा आवाहन करतो, तुम्हाला आरक्षण असलं तरी नसलेल्या भावासाठी मैदानात या. आपली जात संपवण्यासाठी चारी बाजूने वेढा टाकायचं ठरवलं आहे. आपल्याला एकत्र लढून हा वेढा तोडायचा आहे, मी लेकरू म्हणून तुम्हाला सांगतोय माझ्या समाजाकडे लक्ष द्या.

Maharashtra14 News

Recent Posts

तरुण-तरुणींना मिळणार ‘ऑन द स्पॉट’ हक्काची नोकरी- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 मे (प्रतिनिधी)  : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना नामांकित राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय  कंपन्यांमध्ये…

4 days ago

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा…

1 week ago

रक्षक चौक होणार सिग्नलमुक्त – स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केली कामाची पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज.७ मे २०२६ : पिंपळे निलख येथील रक्षक चौकात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम…

1 week ago

अजितदादांचा रेकॉर्ड मोडत, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.04 मे : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे.…

2 weeks ago

निगडीतील हाय टेन्शन टॉवरवर चढलेल्या इसमाचा थरारक बचाव.. अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ एप्रिल २०२६ :-* निगडीतील चिकन चौक, यमुना नगर परिसरात सोमवारी…

2 weeks ago

गोमातेला ‘राष्ट्रमाता’ असा सन्माननीय दर्जा प्राप्त व्हावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरासह ५५०० तालुक्यांमध्ये … ‘गो सम्मान’ आव्हान अभियान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 एप्रिल : संपूर्ण भारतात गोहत्या बंद व्हावी आणि गोमातेला 'राष्ट्रमाता' असा…

3 weeks ago