Categories: Uncategorized

जरांगे पाटलांच्या समर्थनाची मागणी करत, भुजबळांच्या भूमिकेवरुन अजितदादा गटात दुफळी, जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ नोव्हेंबर) : मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी या मागणीला विरोध केला आहे. मात्र, मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवरूनच राष्ट्रवादीतच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.

आम्ही भुजबळांच्या भूमिकेशी सहमत नसून राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजेत, अशी भूमिका पक्षाचे उपाध्यक्ष उदय आहेर यांनी मांडली आहे. तसंच हीच पक्षाची भूमिका असल्याचंही पक्षाध्यक्ष अजित पवारांनी अधिकृतपणे जाहिर करावी, अशी विनंती आम्ही अजितदादांकडे करणार असल्याचंही आहेर म्हणालेत. आज पुण्यात राष्ट्रवादीतील कुणबी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात सरकारने जरांगे यांना दिलेलं आश्वासन हीच पक्षाची भूमिका असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भुजबळ जे भूमिका मांडताहेत ती त्यांची व्यक्तिगत भूमिका असल्याचा सूरही या बैठकीत लावला गेला.

अंबड येथील सभेतून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, “मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा जरांगेंना भुजबळांनी टोला लगावला आहे. आमची सुद्धा लेकरं आहे, तुम्ही वेगळ आरक्षण घ्या, असे भुजबळ म्हणाले.

जरांगे पाटील म्हणाले, की या एल्गारासाठी तुमची जात ओबीसी आरक्षणात गेली, कशाचा आधार घेऊन गेली ते सांगा, ज्यांना ज्यांना आरक्षण कळालं तेच आरक्षणात गेले, आपल्याला आरक्षण कळायला 70 वर्षे गेले. जेव्हा कळालं तेव्हा मराठ्यांची त्सुनामी झाली. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा आवाहन करतो, तुम्हाला आरक्षण असलं तरी नसलेल्या भावासाठी मैदानात या. आपली जात संपवण्यासाठी चारी बाजूने वेढा टाकायचं ठरवलं आहे. आपल्याला एकत्र लढून हा वेढा तोडायचा आहे, मी लेकरू म्हणून तुम्हाला सांगतोय माझ्या समाजाकडे लक्ष द्या.

Maharashtra14 News

Recent Posts

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

12 hours ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

2 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago