महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा देण्याच्यादृष्टीने सर्व धर्मादाय तसेच नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना’ लागू करण्यात यावी, अशी मागणी ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे’ यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ई-मेल केलेल्या पत्रात म्हटले आहे, “सर्वसामान्य गरीब गरजू नागरिकांना आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य याजोना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन महत्त्वाच्या योजना आहेत. या योजना पुण्यातील काही नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्ण या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी धाव घेताना दिसत आहेत. त्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळत आहे.
या योजनांचा सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना फायदा व्हावा यासाठी सरकारने व्यापक विचार करण्याची गरज आहे. राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालये सार्वजनिक न्यासामार्फत चालविल्या जातात. गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देणे हे या रुग्णालयांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील सर्व धर्मादाय तसेच नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्याची सक्ती करावी. त्यामुळे मोठे आणि गंभीर आजार झालेल्या गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळेल.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…