Mumbai : विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी … उदय सामंत यांची माहिती

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि कुलगुरु समीतीची बैठक पार पडली. या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या यावर चर्चा झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं. परीक्षांबाबत कुलगुरुंनी २ दिवसात मार्गदर्शन करावं, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.
अंतिम वर्षाच्या परीक्षा सोप्प्या पद्धतीने घ्याव्यात यासाठी कुलगुरु प्रयत्न करत आहेत.

उद्या १२ वाजता कुलगुरु समितीचा अहवाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्यामुळे १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रॅक्टीकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. दरम्यान, ATKT विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील सोप्प्या पद्धतीने होणार असल्याचं सांगितलं. ३१ ऑक्टोबरपर्यंत परीक्षांचे निकाल लावण्याचं विद्यापिठांना बंधन असेल, असं उदय सामंत यांनी सांगितलं

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago