महाराष्ट्र 14 न्यूज : पाय-या चढत असताना तिस-या ते चौथ्या मजल्यावर जाईपर्यंत धाप लागणं नवीन नाही. ही समस्या सर्रास आपल्या सर्वच स्त्री-पुरुषांमध्ये दिसून येते. पण त्यातही अगदी पाचव्या मजल्यावर जाईपर्यंतही दम लागला नाही तर तुमचं शरीर एकदम सुदृढ आहे असं तुम्ही समजू शकता. फिटनेसबद्दल विचार केला तर पाय-या चढताना आणि उतरताना आपल्या शरीरातील अधिक कॅलरीज खर्च होतात आणि शरीरावरील अतिरिक्त चरीब विरघळून जाते. या घटनाक्रमात आपल्याला अधिक उर्जेची गरज भासते आणि आपण थकून जातो. पण हेच आपल्याला फक्त दोन मजल्यांच्या पाय-या चढल्यावरही होत असेल तर मात्र तुमचे शरीर कमजोर आहे.
दोन मजल्यांच्या पाय-या चढून जर तुम्हाला दम लागत असेल तर याचा अर्थ तुमचे ह्रदय निरोगी नाही. त्यामुळे हे आपले ह्रदय अजून कमजोर होण्यापासून वाचवायचं असेल तर मात्र तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल. ही स्थिती शरीरात निर्माण होणा-या आजारांचे प्राथमिक संकेत देखील असू शकतात. कधी कधी ही समस्या आपण अधिक आळशी (lazy lifestyel) आयुष्य जगत असल्यामुळे देखील होऊ शकते.काही लोकांना पाय-या चढल्यानंतर डोकं जड होणं, चक्कर येणं, डोळ्यांपुढे अंधारी येणे अशा समस्या निर्माण होतात. जर तुम्हालाही अशा समस्यांचा वारंवार अनुभव येत असेल तर मात्र एकदा डॉक्टरची भेट जरुर घ्यावी. कारण ही स्थिती कोणत्यातरी गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…