किल्ले रायगडाच्या विकासासाठी सुमारे चार वर्षांपूर्वी रायगड प्राधिकरण समितीमार्फत किल्ल्यावरील सुमारे साडेतीनशे ठिकाणांचे उत्खन करण्यात येणार आहे. यामध्ये, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन करण्यात येत असून, यामध्ये गेल्या काही वर्षात शिवकालीन शस्त्रांचे अवशेष, नाणी आणि काही अत्यंत दुर्मिळ अशा पुरातन वस्तू आणि वास्तुंचे अवशेष आढळून आले आहेत.
दरम्यान, किल्ले रायगड येथे जगदीश्वर मंदीराशेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये सोन्याची नक्षीदार बांगडी सापडल्याने इतिहासाचा मोठा खजिना सापडला आहे. यामुळे, गेल्या चार वर्षात प्रथमतःच महाराष्ट्राच्या इतिहासात साबुत स्थितीत सापडलेला स्त्रियांचा हा पहिला अलंकार आहे. किल्ले रायगडावर सापडलेल्या या सोन्याच्या बांगडीवर नक्षीकाम करण्यात आले असून, यामुळे सुमारे 350 वर्षांपूर्वीचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहासाची साक्ष देणारा खजिना सापडला आहे.
मागील गेल्या दोन महिन्यांपूर्वी कानातल्या रिंगादेखील आढळून आले आहे. त्यातच, ज्या वाड्यात ही सोन्याची बांगडी सापडली आहे त्याठिकाणी मोठा सरदार राहत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यामुळे, संशोधन करण्याची पुन्हा एक संधी मिळाली आहे. तर, छत्रपती घराण्याचा एक वंशज म्हणून किल्ल्यावर आढळलेली सोन्याची बांगडी ही फार मोठा शोध असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे.
"उत्तुंग यशाची परंपरा" महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक -२७ मे२०२४) : नवी सांगवी. (समर्थ नगर) प्रतिभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…