Categories: Uncategorized

नवी सांगवी पिंपळे गुरव मध्ये चौकाचौकात, रस्त्यांवर आणि पदपथांवर अतिक्रमण वाढले … रस्ते फुटपाथ कशासाठी ? नागरिकांचा मनपाला संतप्त सवाल !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ मार्च) : नवी सांगवी – पिंपळे गुरव येथे पदपथांवर अतिक्रमने वाढल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे. महापालिकेच्या वतीने तात्पुरती कारवाई केले जात असल्याने पुन्हा ही अतिक्रमणे ‘जैसे थे’ होत आहे. त्यातच रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत.

परिसरातील पदपथांवर सायंकाळच्या वेळी भाजीविक्रेते बसत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर टेम्पो लावून भाजी विक्री करण्यात येत आहे. यात एम एस काटे चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, फेमस चौका चा समावेश आहे. तसेच दुकानदारांकडून ठिकठिकाणी पदपथांवर कायमस्वरूपी अतिक्रमणे करण्यात आली आहेत.

नवी सांगवीतील साई चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यासमोर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत अनेक दिवस धूळखात पडून आहेत. तसेच मुख्य चौकापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विक्रेत्यांमध्ये अनेक वेळा वाद होताना आढळतात. महानगरपालिकेकडे अनेक नागरिक याची तक्रार करत आहेत, परंतु तात्पुरती मलमपट्टी करण्याखेरीज महानगरपालिकेकडे कायमस्वरूपी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याचे वारंवार होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी वरून दिसून येते. त्यामुळे मनपाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

वारंवार तक्रार करूनही मनपाचे अधिकारी जुजबी कारवाई करतात, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली असून तरीही विक्रते रस्त्यावर आणि फुटपाथवर आपला व्यवसाय करत असल्याने नागरिकांना वाहन चालवणे आणि फुटपाथ चा वापर करता येत नसल्याच्या तक्रारी जेष्ठ नागरिक आणि महिला करत आहेत. त्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

सुरेश सकट (सामाजिक कार्यकर्ते)

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…

4 days ago

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

2 weeks ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

1 month ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

1 month ago