महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ ऑगस्ट) : राज्य सरकार सर्वसामान्यांचा विचार करून कायमच नवनवीन घोषणांवर भर देत आहे. अशातच राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य सरकार 2011 आधीच्या गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत राज्य सरकारने या विषयावर चर्चा केली. त्यामुळे आता यासंदर्भात लवकरच शासन निर्णय प्रकाशित केला जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित केल्यास लाखो गोरगरिबांना, झोपडपट्टीधारकांना त्याचा लाभ होणार आहे. येत्या काही दिवसात यासंदर्भात सरकारकडून आदेश काढला जाणार आहे.
राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री, विभागांचे सचिव उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…