Categories: Uncategorized

स्वप्नांना सत्यात उतरवण्याआधी त्यांना व्यवस्थित पहावे लागते … नाईक आण्णासाहेब धुंडगे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जुलै) :- विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचे की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे स्वतःला यशस्वी होण्यासाठी नेहमीच प्रयत्नवादी असणे गरजेचे असते. आम्ही ज्यावेळी युद्धभूमीवर असतो त्यावेळी यश मिळते की नाही हे माहीत नसते, पण जिंकणार आम्हीच हीच भावना घेऊन आम्ही युद्ध करतो. म्हणुनच आपण कारगिल मध्ये विजय मिळवू शकलो. आपण स्वप्नांना सत्यात उतरवण्याआधी त्यांना व्यवस्थित पहावे लागते, तरच ती पूर्ण होतात असे मत 24.मराठा लाईफ इन्फंट्री औंध कॅम्प चे सेना मेडल विजेते नाईक आण्णासाहेब धूंडगे यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशुविहर सांगवी आयोजित ‘कारगिल विजय दिन’ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

मी ही एका सामान्य कुटुंबातला असून लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं, फौज मध्ये भरती व्हायचं आणि देश सेवा करायची, ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. घाबरू नका, सत्याला सामोरे जा आणि प्रयत्न करा! यश नक्कीच मिळेल .तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने एक प्रतिभावंत व्यक्ती आहे आणि शिक्षक आदर्श गुरुजन वर्ग आहे, त्यामुळे तुमचे भविष्य हे उज्वल असणार आहे यात शंका नाही असे ते म्हणाले. यावेळी 24 मराठा लाईफ इन्फंट्री औंध कॅम्प चे हवालदार राजेंद्र काळे, विनायक यादव, पवन ठाकूर यांनी कारगिल युद्धाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

याप्रसंगी बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ज्या दोन हजार राख्या बनवल्या होत्या त्या राख्या सीमेवरील जवानांसाठी या 24 मराठा लाईन इन्फंट्री च्या अधिकाऱ्यांच्या हस्ते पाठवण्यात आल्या. अतिशय देशभक्तीपर वातावरण शाळेमध्ये होते सर्वांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली, या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जंगले, खजिनदार रामभाऊ खोडदे,सचिव तुळशीराम नवले , सदस्य प्रकाश ढोरे, राजश्री पोटे व जयहिंद फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सीमा पाटील ,हेमलता नवले ,मनीषा लाड, स्वप्नील कदम, पंचशीला वाघमारे,शितल शितोळे, दिपाली झणझणे, श्रद्धा जाधव, संध्या पुरोहित ,गायत्री कोकाटे , भारती घोरपडे,नीता ढमाले, निर्मला भोईटे, अश्विनी करे,कुसुम ढमाले, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक, शिवाजीराव माने यांनी केले व निवेदन आभार शिक्षक दत्तात्रय जगताप यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली.

Maharashtra14 News

Recent Posts

धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर … जून संपला; पावसाने मारली दांडी, पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न अधिक गंभीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…

2 weeks ago

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उद्योजक ‘सखाराम रेडेकर’ यांना प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…

3 weeks ago

पाणीपुरवठा विभागाकडून प्रभाग 31 आणि 29 नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील पाणीपुरवठा वेळेत असा होणार बदल …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

3 weeks ago

पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू

*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…

4 weeks ago

कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! – आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…

4 weeks ago

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक! किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…

4 weeks ago