महाराष्ट्र 14 न्यूज : देशातल्या सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने ( SBI ) त्यांच्या सर्व ग्राहकांसाठी एक महत्त्वाचं ट्वीट जारी केलं आहे. ट्वीटद्वारे बँकेने सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या अनेक लोक एसबीआयच्या नावाने ग्राहकांना फोन करून वैयक्तिक माहिती विचारत आहेत. त्यामुळे तुम्हालाही असा कोणता फोन आला तर सावध राहा आणि तपासणी केल्याशिवाय आपली खासगी माहिती शेअर करू नका असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. नाहीतर तुम्हाला याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
खरंतर, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये स्वत: ला एसबीआय अधिकारी असल्याचा दावा करत अनेक हॅकर्स ग्राहकांना फोन करतात आणि आपली माहिती घेऊन खातं रिकामं करतात. अशा असंख्य तक्रारीही बँकेकडे आल्या आहेत. त्यानंतर ही बाब बँकेपर्यंत पोहोचली की हा कोणी बँकेचा माणून नसून फसवणूक करणारा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या सर्व ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. काही सायबर हॅकर्स बँक अधिकारी केवायसी व्हेरिफाय करण्याच्या नावाखाली लोकांना कॉल करत आहेत. आपण त्यांना माहिती देताच खात्यातून पैसे काढले जात आहेत. अशा कॉल किंवा मेसेजपासून सावध रहा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारा कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं भासवून तुमची वैयक्तिक माहिती गोळा करेन आणि तुमच्या खात्यामधून सगळे पैसे काढून घेईन. असं काहीही तुमच्यासोबत घडलं तर तात्काळ http://cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा.
"उत्तुंग यशाची परंपरा" महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक -२७ मे२०२४) : नवी सांगवी. (समर्थ नगर) प्रतिभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…