या निर्णयाचा पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आणि या क्षेत्राशी संबंधित पाच लाख कामगारांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यांवर थेट जमा करण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारासंबंधीच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 कोटी रुपयांची मदत करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. सध्या देशात पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यावर अवलंबून असलेले लोक आहेत. याव्यतिरिक्त, पाच लाख कामगार साखर कारखान्यांमध्ये आणि पूरक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांची उपजिविका साखर उद्योगावर आधारीत आहे.
अन्न मंत्रालयाने 2020-21 या मार्केटिंग इयरमध्ये ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 महिन्यात 60 लाख टन साखर निर्यातीसाठी 3,600 कोटी रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव दिला होता. केंद्र सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षात 10 हजार 448 रुपये प्रतिटन साखर निर्यातीवर सबसिडी दिली होती. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 6 हजार 268 कोटी रुपयांचा बोजा पडला होता. चालू आर्थिक वर्षात सरकारने मागील वर्षाच्या तुलनेत कमी सबसिडी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…