Categories: Editor Choice

राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात , पण …पहा,राजेश टोपे काय म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ एप्रिल) : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ-उतार दिसू लागल्याने सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याचे, चिंता व्यक्त करू नये असे त्यांनी म्हटले. मागील काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मास्कची गरज नाही, मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, आम्ही सध्या ट्रेकिंग यंत्रणेवर अधिक जोर दिला आहे. टास्क फोर्सकडूनही माहिती घेतली जात आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीवर आमचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांचे लसीकरण सुरू असून 12 ते 15 या वयोगटातील मुलांनादेखील लस दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. सध्या हे बुस्टर डोस खासगी रुग्णालयातून दिले जात असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवरुन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ज्या पाच राज्यांना पत्र पाठवलंय. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली.

वाढत्या संसर्गामुळे केंद्राचं राज्यांना पत्र

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये सतत वाढणाऱ्या कोरोना सकारात्मकतेच्या दराचा उल्लेख करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करत आरोग्य मंत्रालयाने याबाबत आवश्यक पाऊलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय राज्यांनाही सतर्क राहण्याचा सूचना ही देण्यात आल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

15 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

20 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago