महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का दिला आहे. एकाच विभागामध्ये वर्षानुवर्षे काम करणारे अधिकाऱ्यांना हा धक्का दिला आहे. राज्य शासनाचे सहसचिव माधव वीर यांनी काढलेल्या आदेशामुळे अनेक अधिकाऱ्यांना आपले सध्याचे कार्यालय सोडावे लागणार आहे.
या अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी जाण्यासाठी कमी मुदत दिली आहे. येत्या १७ एप्रिलपर्यंत त्यांना नवीन जागेवर रुजू व्हावे लागणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना हा धक्का आहे.
पुणे विभागातील 13 तहसीलदारांच्या बदल्या शिंदे-फडणवीस सरकारने केल्या आहेत. या सर्व जणांना 17 तारखेपर्यंत नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश सहसचिव माधव वीर यांनी काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, मावळ, वेल्हा ,मुळशी या पाच तालुक्यातील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.
मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची बदली झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील तहसीलदार संवर्गातील एकूण 32 जणांच्या बदल्या करण्यात आल्याचे आदेश पत्रक शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून काढण्यात आले आहे. यात मावळ तालुक्याचे सध्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची थेट गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका तहसीलदार पदी बदली झाली आहे.
विक्रम देशमुख असणार नवे तहसीलदार….
मधुसूदन बर्गे यांची बदली होत असल्याने त्यांच्या जागी कोण येणार, याची सर्वत्र चर्चा होत असताना विक्रम देशमुख हे मावळचे नवे तहसीलदार असतील असे समजत आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…