Categories: Uncategorized

आगामी काळात रासप भाजपासाठी ठरू शकते डोकेदुखी … महादेव जानकर म्हणाले, अन्यथा … !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जुलै) : राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघात आजपासून महादेव जानकर हे आपल्या पक्षाची यात्रा घेऊन निघालेले आहेत. भाजपने जर आमचा विचार केला नाही तर लोकसभेच्या देशात 453 जागा लढवणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, एक दिवस मी देशाचा पंतप्रधान बनणार आणि विठ्ठलाच्या दर्शनाला येणार असा दावाही महादेव जानकर यांनी केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच एनडीएमधील (NDA) मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे.

याचबरोबर, बारामती लोकसभा हा आपला आत्मा असून बारामतीची जागा यासाठीच मागितली असून तिथूनही लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, शरद पवार हे खूप हुशार व मातब्बर राजकारणी आहेत, सध्या राष्ट्रवादीचे काही नेते अडचणीत आल्याने त्यांनी अजित पवार यांना इकडे पाठवले असण्याची शक्यताही महादेव जानकर यांनी बोलून दाखवली.

आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या पाच जागा दिल्या तर भाजपसोबत एनडीएमध्ये राहू अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

राज्यात भाजपमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे नवीन गट सामील झाल्यामुळे एकप्रकारे महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. महादेव जानकर यांनी आज पंढरपूरमधील संत नामदेव पायरी पासून जनस्वराज्य यात्रेला शुभारंभ केला. यावेळी सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून जनता शहाणी असते, असा टोला महादेव जानकर यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, महादेव जानकर यांच्या भूमिकेमुळे आगामी निवडणूक काळात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर यांची भूमिका भाजपला चांगलीच अडचणीत आणणारी ठरू शकते. कारण, बारामती, माढा, सांगली, परभणी आणि ईशान्य मुंबई या महादेव जानकर यांनी मागितलेल्या सर्व पाचही जागांवर आतापर्यंत भाजप निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आगामी काळात रासप भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.

Maharashtra14 News

Recent Posts

धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर … जून संपला; पावसाने मारली दांडी, पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न अधिक गंभीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…

2 weeks ago

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उद्योजक ‘सखाराम रेडेकर’ यांना प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…

3 weeks ago

पाणीपुरवठा विभागाकडून प्रभाग 31 आणि 29 नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील पाणीपुरवठा वेळेत असा होणार बदल …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

3 weeks ago

पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू

*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…

4 weeks ago

कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! – आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…

4 weeks ago

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक! किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…

4 weeks ago