Categories: Editor Choice

कुष्ठपिडित लोकांच्या समस्या सोडविणार – खासदार श्रीरंग आप्पा बारणे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०५ जानेवारी) : राज्य सरकारकडून नव्याने दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याची घोषणा केली त्यातूनच राज्यभरातील दिव्यांग बांधवांच्या आशा पल्लवीत झाल्या असून त्यांचे अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावी यासाठी अपाल संघटनेच्या अध्यक्षा मायाताई रणवरे व महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेत निवेदन देण्यात आले.

त्यात प्रामुख्याने दिव्यांगांना नोकर भरतीत विशेष सवलत,नव्याने प्रस्थापित दिव्यांग मंत्रालयात महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेच्या किमान ४ सदस्यांची नेमनुक करण्यात यावी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरी उपलब्ध करून देण्यात यावे व संजय गांधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम वाढवून मिळावी यासह अन्य मागणीचे पत्र खा.श्रीरंग आप्पा बारणे यांना देण्यात आले.

सदर प्रकरणी या सरकारकडून आत्तापर्यंत घेण्यात आलेले सर्व निर्णय लोकहिताचे व राज्यातील जनतेच्या भल्यासाठीच घेतले असून दिव्यांग व कुष्ठपिडिताच्या प्रश्न सोडविण्यासाठी देखील हे सरकार कटिबद्ध असून त्यासाठी मा.मुख्यमंत्री साहेबांची भेट घेत कुष्ठपिडितांच्या सर्व समस्या जातीने लक्ष घालून सोडविण्याचे आश्वासन दिले त्याप्रसंगी पिंपरी युवासेनाप्रमुख निलेश हाके,महाराष्ट्र कुष्ठपिडित संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र चव्हाण सचिव अशोक आंबेकर व हर्षल जाधव व अपाल संस्थेच्या अध्यक्षा मायाताई रणवरे उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

6 days ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

2 weeks ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

4 weeks ago