Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

फोनवरुन शिवीगाळ का केली? जाब विचारायला गेलेल्या दोघांची पुण्यात निर्घृण हत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जुलै) : फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात रविवारी ही घटना घडली. या प्रकरणातील आठही आरोपी पसार झाले आहेत.

शिवम संतोष शितकल (वय 23) गणेश रमेश माखर (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता. दौंड, जि. पुणे) अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत. फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखंडा येथील भानोबा मंदिरासमोर रविवारी रात्री ही घटना घडली.

Google Ad

या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे रात्रीपासून पाटस गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, मोहन टुले योगेश शिंदे आणि इतर पाच अनोळखी युवकांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पाटस गावामध्ये रात्रीपासून तणाव निर्माण झाले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

72 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!