किशोर कदम यांनी लिहिलं आहे,”मुंबईहून पुण्याला जाताना एक्सप्रेस हायवेवर 240 रुपये टोल घेतात..मध्ये मन:शांती वगैरेमध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का”.
सौमित्र यांनी पुढे लिहिलं आहे,”एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात. ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही…लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?”.
किशोक कदम यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. “मोठ मोठे खड्डे आहेत तरी टोल आकारला जातो..नुसता काळाबाजार, सरकार लुटत असते..जनता निमूटपणे लुटत असते, सदासर्वदा हीच परिस्थिती आहे, जुना हायवे वापरा सरळ, सरकार वेगवान आहे, भयंकर लूटमार सुरू आहे, लोकांनाअजूनही बोलता येत नाही हीच मोठी शोकांतिका आहे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
किशोर कदम यांच्याआधी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुखनेदेखील मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘खरचं असा नियम आहे? आणि असला तर तो बरोबर आहे का?’ असा प्रश्न तिने नितीन गडकरी यांना विचारला होता. तसेच ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेते मिलिंद दास्तानेही त्यांना आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…