महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जुलै) : निवडणुकीला उभारलेल्या उमेदवाराची सर्व माहिती जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. मतदान करणं हा देशातील नागरिकांचा हक्क आहे, तसं माहिती जाणून घेणं हा ही अधिकार मतदारांना आहे.
न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने हे मत मांडलं आहे. त्यांनी सांगितलं, की मतदानाचा हक्क हा अमूल्य आहे. प्रदीर्घ आणि कठोर स्वातंत्र्यलढ्याचा परिणाम म्हणून हा हक्क देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळाला आहे. त्यामुळे हा नागरिकांचा अविभाज्य अधिकार असल्याचं ते म्हणाले.
लोकशाही ही राज्यघटनेची एक अत्यावश्यक बाब आहे. मात्र, तरीही मतदानाचा अधिकार हा केवळ वैधानिक अधिकार मानला जातो. भारतात मतदानाचा हक्क हा मूलभूत अधिकारांमध्ये गणला जात नाही हा मोठा विरोधाभास असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केलं.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…
: आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने नागरी वस्तीत तारांबळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे २०२५ – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० मे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीच्या अंतिम निकालात…