महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जुलै) : एकीव, ता. जावळी धबधब्यापासून साताऱ्याच्या दिशेकडील डाव्या बाजूस साधारण पन्नास मीटर अंतरावर साडेसातशे फूट खोल दरीत पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा स्थानिकांच्या मदतीने पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने दोन्ही तरुणांचे मृतदेह दरीतून वर काढले.
जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर रविवारी दुपारी पर्यटनासाठी साताऱ्यातील युवकांचे दोन ग्रुप आले होते. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान दोन्ही गटांत वादावादी होऊन धबधब्यापासून साताऱ्याच्या दिशेला डावीकडील बाजूस साधारण पन्नास मीटर अंतर परिसरातील साडेसातशे फूट खोल दरीत दोन युवक कोसळले. यामध्ये अक्षय शामराव आंबवणे (वय २८, बसाप्पाचीवाडी, ता. सातारा) तसेच गणेश फडतरे (वय ३५, करंजे, ता. सातारा) हे दोन युवक गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तरुणांच्या वादावादीतून ढकलून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस व शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमद्वारे रात्री उशिरा शोधमोहीम सुरू केली. दाट झाडीझुडपे, किर्रर्र अंधारात मुसळधार पावसामुळे शोधमोहिमेत व्यत्यय येत होता. दरम्यान, रात्री दीड वाजता मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांना यश आले. या घटनेची मेढा पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 07 ऑगस्ट -- राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वहायला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि..04 ऑगस्ट :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याची जागेवरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…