महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑगस्ट) : सांगवी परिसरात संकल्प वेल्फेअर च्या वतीने ७५ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने “वृक्षरोपण” करण्यात आले. वृक्ष ही राष्ट्रीय संपत्ती असुन. ती वाढवण्यासाठी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. यावेळी सुजित पोंगडे,अंकित नाईक, शुभम ढमाले,पराग ढोरे ऋषभ कांबळे,आशुतोष आबनावे ,शिरतेश आगरवाल आदी याच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ७५ झाडांचे वृक्षरोप करण्यात आले.
यावेळी सुजित पोंगडे म्हणाले की, करू वृक्षाचे संवर्धन राखू पर्यावरणाचं संतुलन! विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल ढळणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. येत्या काळात मोठ्याप्रमाणात वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
14 Comments