महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मार्च) : आपण हायवेवरून प्रवास करताना आपल्याला अनेक वेळा टोल प्लाझावर थांबावे लागते आणि येथे आपला बराच वेळ वाया जातो त्यावेळी आपली मानसिकता खराब होते. परंतु टोलनाक्यांवर लागणारा हा सरासरी वेळ कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यातच, आता देशातील महामार्गांवरील टोलनाके हटविण्यासाठी सरकार पुढील सहा महिन्यांत GPS वर आधारित टोल कलेक्शन सिस्टिमसह इतरही काही तंत्रज्ञान आणणार आहे. यासंदर्भात खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या मागचा उद्देश रस्त्यावर जाम होण्यापासून रोखणे आहे. चेंबर ऑफ कॉमर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII)च्या एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा (NHAI) सध्याचा टोल महसूल 40,000 कोटी रुपये आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत तो वाढून 1.40 लाख कोटी रुपये होईल. सरकार देशातील महामार्गावरील टोल प्लाझा हटविण्यासाठी जीपीएस बेस्ड टोल सिस्टिम सारखे तंत्रज्ञाना आणण्याचा विचार करत आहे. आम्ही सहा महिन्यात नवे तंत्रज्ञान घेऊन येऊ असेही ते म्हणाले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहनांना थांबवल्याशिवाय, टोल कलेक्शन करण्यासाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळख प्रणालीवर काम करत आहे. आर्थिक वर्ष 2018-19 दरम्यान टोल प्लाझावर एक वाहन थांबण्याचा सरासरी वेळ 8 मिनिट एवढा होता. 2020-21 आणि 2021-22 मध्ये फास्टॅग आल्यानंतर, टोल प्लाझावर वाहने थांबण्याचा सरासरी कालावधी कमी होऊन 47 सेकंदांवर आला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…