Categories: Uncategorized

6 महिन्यांत टोल प्लाझा हटणार … टोल कलेक्शन सिस्टिमसह नितीन गडकरी आणणार नवीन तंत्रज्ञान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ मार्च) : आपण हायवेवरून प्रवास करताना आपल्याला अनेक वेळा टोल प्लाझावर थांबावे लागते आणि येथे आपला बराच वेळ वाया जातो त्यावेळी आपली मानसिकता खराब होते. परंतु टोलनाक्यांवर लागणारा हा सरासरी वेळ कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यातच, आता देशातील महामार्गांवरील टोलनाके हटविण्यासाठी सरकार पुढील सहा महिन्यांत GPS वर आधारित टोल कलेक्शन सिस्टिमसह इतरही काही तंत्रज्ञान आणणार आहे. यासंदर्भात खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या मागचा उद्देश रस्त्यावर जाम होण्यापासून रोखणे आहे. चेंबर ऑफ कॉमर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII)च्या एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ते म्हणाले, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा (NHAI) सध्याचा टोल महसूल 40,000 कोटी रुपये आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत तो वाढून 1.40 लाख कोटी रुपये होईल. सरकार देशातील महामार्गावरील टोल प्लाझा हटविण्यासाठी जीपीएस बेस्‍ड टोल स‍िस्‍टिम सारखे तंत्रज्ञाना आणण्याचा विचार करत आहे. आम्ही सहा महिन्यात नवे तंत्रज्ञान घेऊन येऊ असेही ते म्हणाले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहनांना थांबवल्याशिवाय, टोल कलेक्‍शन करण्यासाठी ऑटोमॅट‍िक नंबर प्लेट ओळख प्रणालीवर काम करत आहे. आर्थिक वर्ष 2018-19 दरम्यान टोल प्लाझावर एक वाहन थांबण्याचा सरासरी वेळ 8 मिनिट एवढा होता. 2020-21 आणि 2021-22 मध्ये फास्टॅग आल्यानंतर, टोल प्लाझावर वाहने थांबण्याचा सरासरी कालावधी कमी होऊन 47 सेकंदांवर आला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

2 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

2 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

4 weeks ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago