महाराष्ट्र 14 न्यूज : मराठा समजला राज्य सरकारने दिलेले आरक्षण अखेर सर्वोच्च न्यायालयात निकाली निघाले आहे. मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यासाठी अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दखल केली. त्यांच्या बाजूने जयश्री पाटील यांचे पती अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याबाबत त्यांची बाजू मांडली. त्याच अॅड. सदावर्ते यांनी बीबीसी मराठी यांच्याकडे अनेक मुद्द्यांवर आपली बाजू मांडली आहे. अनेक गौप्यस्फोटही त्यांनी त्याद्वारे केले आहेत.
कोर्टाच्या निर्णयाने जातीच्या विरूध्द घाणेरड्या राजकारण करणाऱ्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे हा लढा यापुढेही सुरूच राहणार आहे. मराठा आरक्षणासाठी निघालेले 52 मोर्चे साखर कारखान्यातील लोक, राजकीय लोकांच्या मदतीने काढलेले असल्याने मोर्चांमध्ये कुठेही वेदना नव्हत्या.
कोणीही म्हटल्याने मागास ठरत नाहीत. पुराव्यानिशी ते सिद्ध करावे लागते. गरीबी हटावचा नारा देत तुम्ही आरक्षण आणू शकत नाही. हा फक्त राजकीय मुद्दा आहे. भारतीय संविधानाच्या मूलतत्त्वानुसार आरक्षण हे मोगलाईप्रमाणे देऊ शकत नाही, असे सदावर्ते यांनी त्या मुलाखतीत म्हटले आहे.
त्यांनी या आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणाचा नेमका विरोध होता, याचाही गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, आंबेडकरी संघटनेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघापर्यंत सर्व राजकीय पक्षांचा याला विरोध होता. मराठा नावाची एक जात नाही. या अनेक जाती आहेत. तुम्ही सर्वांना एकत्र करून एक जात करू शकत नाही.
हे कोर्टात सिद्ध केले आहे. कमळापासून, शिवसेनेच्या बाणापर्यंत आणि आंबेडकरी संघटनेपासून ते घडाळ्यापर्यंत सर्व नेते यात मला सांगायचे तुम्ही योग्य करताय पण आमच्या राजकीय अडचणी आहेत. मी आता कोणाची नावं घेणार नाही. पण मी एक पुस्तक लिहीतोय यात मी सर्वकाही नावासह लिहिणार आहे.
13 Comments