Categories: Uncategorized

पिंपळे गुरव मधील ‘सह्याद्री कॉलनी’चे चक्क नावच बदलले … हे चाललंय काय, नागरिकांमध्ये संताप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ सप्टेंबर)  : पिंपळे गुरव, नवी सांगवीच्या मध्यावर असलेल्या सह्याद्री कॉलनीचे काही लोकांनी अचानक नाव बदलल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करीत बदलेला श्रावस्ती बौद्ध विहार नावाचा फलक काढून पुन्हा ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक पूर्ववत बसविला. विशेष म्हणजे श्रावस्ती बौद्ध विहार या फलकावर महापालिकेचे चिन्ह व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा उल्लेख होता. 

गेल्या वीस वर्षांहून अधिक जुनी असलेल्या सह्याद्री कॉलनीचे नाव अचानक बदलण्यात आले. त्याजागी श्रावस्ती बौद्ध विहार नामकरणाचा फलक लावण्यात आल्याने परिसरात नागरिकांमध्ये, युवकांमध्ये चर्चा होऊ लागली. हा फलक नेमका कोणी लावला, हे अद्याप कुणालाही माहीत नाही. ह क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही हा फलक नेमका कुणी लावला याबाबत माहीत नाही.

वर्षभरापूर्वी मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, पदपथ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. हे काम सुरू असताना ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक तात्पुरता काढून टाकण्यात आला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ‘श्रावस्ती बौद्ध विहार’ या नावाचा फलक उभा करून त्यावर महापालिकेचे चिन्ह, तसेच ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ असा उल्लेख करून हा फलक अज्ञात व्यक्तीने लावून येथील परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडवून दिली.

यावेळी परिसरातील नागरिकांनी आमचे आधारकार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, पाणी पट्टी, टॅक्स पावती आदी कागदपत्रांवर पूर्वीपासून सह्याद्री कॉलनी असा पत्ता असताना येथील सह्याद्री कॉलनीचे नाव बदलून श्रावस्ती बौद्ध विहार या नावाचा फलक कसा काय लावला जावू शकतात. कुणाची परवानगी घेऊन हा फलक या ठिकाणी लावण्यात आला. या ठिकाणी असलेल्या ट्रस्टचाही पत्ता सह्याद्री कॉलनी आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम नेमकं कोण करीत आहे ?  असा सवाल येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

नागरिकांनी ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी हे कृत्य चुकीचे आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष न करता सदर फलक नावात बदल करून कोणी लावला, याचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन आयुक्तांकडे देणार असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सांगितले. येथील परिसरातील नागरिकांमध्ये असा असंतोष पसरवून नेमके काय साध्य करायचे आहे ? याचाही शोध घेण्यास सांगण्यात येणार आहे.

यावेळी लोकप्रतिनिधी, तसेच नागरिकांनी स्व:खर्चाने त्वरित ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक तयार करून अवघ्या तासाभरात त्याच ठिकाणी काही अंतरावर उभा करून त्या फलकाला राजेंद्र जगताप व उपस्थित नागरिकांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. याप्रसंगी शंकर रेणुसे, संदेश भोसले, बाळासाहेब मखरे, बळवंत बनसोडे, सुधाकर सूर्यवंशी, सुखदेव शिंदे, एस. बी. शिंदे, हरिवंश राम, गणेश मराठे, राहुल बडे, ज्ञानेश्वर चौधरी, विजय वराडे, संतोष बिबवे यांच्यासह सह्याद्री कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर ठिकाणी फलक लावण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. पालिकेकडून कोणीही सध्या फलक लाववलेला नाही. आधीच्या नावाप्रमाणेच फलक लावणे बंधनकारक आहे. उद्या मी स्वतः पाहणी करतो. बेकायदेशीर फलक असल्यास संबंधित विभागाकडून तो फलक काढून जप्त करण्याचे आदेश देण्यात येतील.
उमेश ढाकणे, ह क्षेत्रीय अधिकारी

Maharashtra14 News

Recent Posts

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

4 days ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

3 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago