महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी- पिंपळे गुरव येथे भारतीय जनता पक्षाच्या सांगवी -काळेवाडी मंडलच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप तसेच माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला जेष्ठ नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते.
आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये फकिरा (१९५९) समाविष्ट आहे, जिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे.
नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धूळीसारखे असते धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारधार बनते अशी त्यांची विचारसरणी होती तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच असे ठामपणे वक्तव्य करणारे टिळक यांनी इंग्रजांना हैराण केले होते टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. टिळकांनी जनतेमध्ये एकोपा राहावा या हेतूने सार्वजनिक गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात सुरु केले.
आज या दोन्ही महान वयक्तींच्या विचारांना समोर नेण्याची गरज आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेहण्याच्या करिता असे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. यावेळी नवी सांगवी- पिंपळे गुरव येथे भारतीय जनता पक्षाच्या सांगवी -काळेवाडी मंडलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.