Categories: Editor Choice

महाराष्ट्राचा ५६वा वार्षिक निरंकारी संत समागम औरंगाबाद मध्ये होणार संपन्न… पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातून हजारो भाविक उपस्थित…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २७ जानेवारी, २०२३) : महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या तारखा जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे निरंकारी भक्तगणांकडून समागमाच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या विशाल संत समागमाची पूर्वतयारी मागील २५ डिसेंबरपासून विधिवत रूपात सुरु झाली आणि तेव्हापासून केवळ औरंगाबादच नव्हे तर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून हजारोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण व निरंकारी सेवादलाचे महिला व पुरुष स्वयंसेवक समागम स्थळावर येऊन मोठ्या श्रद्धेने, आवडीने आणि समर्पणाच्या भावनेने आपल्या निष्काम सेवा निरंतर अर्पण करत आहेत. विदित असावे, की औरंगाबादमधील बिडकीन स्थित डीएमआयसीच्या मैदानांवर दिनांक २७ ते २९ जानेवारी, २०२३ दरम्यान संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी आणि त्यांचे जीवनसाथी निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात हा संत समागम आयोजित होत आहे.
महाराष्ट्राचा वार्षिक निरंकारी संत समागम ला पिंपरी-चिंचवड मधून सुमारे १०,००० हुन अधिक भाविक भक्तजन रवाना होणार आहेत अशी माहिती मिशनचे पुण्याचे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली.

महाराष्ट्राचा वार्षिक निरंकारी संत समागम अनेकतेत एकता, भक्ती, प्रेम व मानवता यांचा एक अनुपम संगम असतो ज्यामध्ये केवळ निरंकारी भक्तगणच नव्हे तर ईश्वरामध्ये आस्था बाळगणारा प्रत्येक मनुष्य सहभागी होऊन मिशनच्या दिव्य शिकवणूकीतून प्रेरणा घेऊन स्वत:ला धन्य समजत असतो. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या संत समागमामध्ये विविध संस्कृती, सभ्यता यांचा विलोभनीय मिलाफ झाल्याचे सुंदर दृश्य साकार होईल ज्यातून अलौकिक आनंदाची अनुभूती प्रत्येकाला प्राप्त होऊ शकेल.

समागम स्थळावर स्वच्छतेविषयक सेवा असो, ट्रॅक्टरची सेवा असो, राजमिस्त्रींची सेवा असो, लंगरची सेवा असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सेवा असो समस्त भक्तगण त्यामध्ये हिरीरिने भाग घेऊन आपले भरपूर योगदान देत आहेत. यामध्ये बालक असोत, युवावर्ग असो किंवा वयस्कर मंडळी असोत सर्वांमध्ये एक नवऊर्जा व उत्साहाचा संचार झाल्याचे चित्र दिसत आहे. संत समागमाच्या सेवेत भाग घेता आला याबद्दल हे भक्तगण स्वत:ला भाग्यवान समजत असून सद्गुरु माताजींच्या प्रति कृतज्ञतेचे भाव व्यक्त करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

12 hours ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

18 hours ago

हिंजवडी आयटी पार्कमधील रस्ता रुंदीकरणावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला … अजित दादा काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…

2 days ago

राखीच्या धाग्याने विणला ‘बहीण भावाच्या’ नात्याचा विश्वास’! पिंपळे गुरव येथे सौ पल्लवी जगताप यांच्या कडून अंध अनाथ कल्याण केंद्रात अनोखा रक्षाबंधन सोहळा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…

3 days ago

आमदार ‘शंकर जगताप’ यांनी आयोजित केलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमात ७५३ तक्रारींचे निराकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…

4 days ago

पिंपळे गुरव येथील ‘ब्रिलियंट स्टार प्री स्कूल’ मध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…

4 days ago