महाराष्ट्र 14 न्यूज, ( बुधवार, दि .२८ जुलै २०२१) : न्याहरी – भाग ८७ श्री संत तुकोबाराय विचारमाला वाहिल्या उद्वेग दुःखचि केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ।। ( अभंग क्र .११७८ वै.खांदारकर महा.गाथाभाष्य )
रामकृष्णहरि ! चिंता केल्याणे केवळ दुःख प्राप्त होते ; संचित कर्माचे फळ तर भोगावेच लागेल .
श्री तुकोबाराय म्हणतात वैभवांची सुखे नातळता अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ।।
चिंता आपल्या वाट्याला आलेल्या सुखाचाही उपभोग घेवू देत नाही , तर मग आपल्या हातुन घडणार्या पापांचं काय करेल ? त्यातुन झोपेची गोळी सुध्दा आपली सुटका करू शकत नाही.म्हणुन आपलं संचित कर्म बलवान आणि पवित्र असावं .
नाही तर शेजारी म्हणती मरेणा का मेला । आणिला कंटाळा येणे आम्हा ।। जगाला सत्य आणि माणसातील भलेपणा आवडतो … जे झालं ते गंगेला मिळालं , त्याची चिंता करू नका.पण निदान या क्षणापासुन तरी आपण गेल्या नंतर कोणीतरी आपला फोटो घराच्या भिंतीवर लावावा असं काहीतरी करूया . तुका म्हणे आता सकळाचे सार । करावा व्यापार तरी ऐसा ।।
राष्ट्रिीय शिवकीर्तनकार
प्रा.डॉ. / गजानन महाराज वाव्हळ , पुणे
मो.९७६५३८७०४०
70 Comments