महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जुलै) : जमीन बांधाच्या वादातून वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील केंदूर येथील ताथवडे वस्तीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 69 वर्षीय वृद्धाची त्याच्या नातेवाईकांनीच हत्या केल्याचा आरोप आहे.
शिरुर तालुक्यात केंदूर येथील ताथवडे वस्तीत जमिनी बांधाच्या वादातून 69 वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आरोपी भरत उर्फ बबलू सुदाम चौधरी याच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेले शंकरराव ताथवडे आणि भरत हे एकमेकांचे नातेवाईक होते. जमिनीच्या बांधाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा सर्व प्रकार घडत असताना वृद्धाची पत्नी निर्मला शंकरराव ताथवडे या मध्ये आल्या. त्यावेळी आरोपी भरत याने त्यांनाही उजव्या हाताचा दंड आणि डोक्यावर मारहाण केली. शंकररावांची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. कलम 302 प्रमाणे शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
83 Comments