दापोडीतील गरिबांचे तारणहार … ‘संदीप गायकवाड’ यांनी आपल्या बंधूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील गरिबांना दिला आधार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१जून) : दापोडीतील सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त संदिपदादा गायकवाड यांच्या प्रयत्नातून व पिंपरी विधान सभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडीत रुग्णवाहिका उद्घघाटन प्रोफेसर एन.जे.पवार सर ( कुलगुरू डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ )
यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी दापोडीतील नगरसेवक रोहितअप्पा काटे, नगरसेविका स्वाती (माई) काटे, अनिकेत काटे, सनी ओव्हाळ, मेहबूब शेख, जनतबी सय्यद, सुप्रिया काटे, भाऊसाहेब म्हस्के, सुवर्णा काळभोर, व परिसरातील नागरिक उपस्थित होते. संदिपदादा गायकवाड यांच्या वतीने स्वखर्चाने दापोडी परिसरातील सर्व नागरिकांनसाठी ही रुग्णवाहिकेची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या संकट काळात सेवा करणाऱ्या पोलीस , आरोग्य व वैद्यकीय , पत्रकार सामाजिक या क्षेत्रातील दशरथ तलवारे , जितेंद्र ठोंबरे , प्रिया देवकर , अनिल वडघुले, रमेश भोसले , राजाराम रागपसरे कन्हैय्यालाल चंडालिया , गणेश जवळकर , शोभा थोरात या मान्यवरांना कोविड १ ९ या संसर्गजन्य रोग आटोक्यात आणण्यासाठी जे योगदान दिलेले आहे या व्यक्तींना ‘कोविड योद्धा‘ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्याच बरोबर आयुष्यमान भारत योजनेचे ५ लाख रुपयेचे विमा कार्डचेही वाटप यावेळी करण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेत प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाख रुपये वीमा उपलब्ध आहे. या योजनेत लाभार्थ्याला देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रूग्णालयांमधून (जे या योजनेत नावनोंदणी केलेले आहेत) कॅशलेस लाभ घेण्याची मुभा दिली जाईल. या योजनेचे वैशिष्टय म्हणजे लाभार्थ्याला कुठलाही अर्ज भरावा लागणार नाही. सहज सुलभपणे रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय उपचारासाठी अनेकांना घरे गहाण ठेवावं लागतं. कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशावेळी ‘आयुष्मान भारत’ योजना ही वरदान ठरणार असून दारिद्यरेषेखाली जाण्याचे दृष्टचक्र थांबेल. असेही संदीप गायकवाड यावेळी म्हणाले.

संदीप गायकवाड यांच्या वतीने दापोडी परिसरातील कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या अनेकांना कोरोनाच्या या संकट काळात अन्नधान्य किटचे मुस्लिम समाजातील काही गरीब कुटुंबाना शिरखुरमा किटचे वाटप, ईदच्या काळात अनेक ठिकाणी खिरीचे वाटप करण्यात आले.

संदिप गायकवाड’ आणि त्यांचे बंधू ‘नितीन गायकवाड’ यावेळी बोलताना म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात अनेक लोकांना रुग्णालयात पोहचण्यासाठी उशिर झाला त्यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे काहींनी आपले कुटुंबातील सदस्य गमावले, त्यांचे हाल पहावले नाहीत, आपल्या परिसरातील कोणावरही अशी वेळ येऊ नये. संकटकाळात आपल्या माणसांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळेच आम्ही कुटुंबाने हे सेवाकार्य करण्याचे व्रत हाती घेतले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago