Categories: Editor Choice

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून मराठी शाळांचे डिजिटलायजेशन करणेबाबत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांना निवेदन..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १२ ऑक्टोबर) : राज्यशासनाने  राज्यातील ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याचा निर्णय घेत तशी कार्यवाही सुरु केली आहे. हे निषेधार्ह आहे. शासनाच्या या  निर्णयामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे. शाळा घरापासून लांब गेल्यानंतर विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण  वाढेल. मुली तर शिक्षणाच्या प्रवाहातूनच बाहेर फेकल्या जाण्याची परिस्थिती निर्माण होईल.शासनाचा हा निर्णय शिक्षण हक्क कायदयाचे उल्लंघन करणारा आहे. ग्रामिण, कष्टकरी, शेतकरी, आदीवासी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवायचे असेल तर हा निर्णय तातडीने मागे घेण्याची गरज आहे.
     निवेदनात म्हटले आहे की, राज्यशासन कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यावर भर देते परंतु मराठी शाळांची पटसंख्या  कमी का  होत आहे याचा विचार करत नाही. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचे व स्पर्धेचे युग आहे.त्यामुळे  इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आज मोठ्या प्रमाणात पालक पसंती देत आहेत.गरीब पालकांची परिस्थिती नसेल तरी अगदी काबाडकष्ट करून ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांचे शिक्षण देण्यासाठी धडपडत असतात.यामुळे मराठी शाळा ओस पडत चालल्या आहेत..मराठी शाळांकडे शासन लक्ष देत नाही.ग्रामीण भागातील मराठी शाळांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे.आणि या सर्व कारणांमुळेच आज मराठी शाळांची पटसंख्या कमी होत चालली आहे.
यामुळे राज्यशासनाला आमची विनंती आहे कि आजही  मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. या वर्गाचा विचार करून व इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत मराठी शाळांचे अस्तित्व टिकवायचे असेल व मराठी शाळांची पटसंख्या टिकवून ठेवायची  असेल व मराठी शाळॆत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकवायचे असेल  तर राज्यातील सर्व मराठी शाळांचे डिझिटलायझेशन झाले पाहिजे.प्रत्येक मराठी शाळांमध्ये सेमी इंग्लिश क्लास सुरु करण्यात यावेत.चांगल्या दर्जाचे शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात याव्यात. तसेच ज्या मराठी शाळा गुणवत्ता देतील अश्या मराठी शाळांना सन्मान पुरस्कार देण्यात यावेत.
    या विषयाचे निवेदन रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड तहसीलदार यांचेमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

11 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

15 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago