महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील नवीसांगवीतील साई चौकामध्ये भाजी मार्केट येथील रोहित्रला सर्व बाजूंनी जाहिरात फलकाने गिळंकृत केले आहे, यात चूक कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना २४ तास अत्यंत जबाबदारी चे काम असते, मग जाहिरात लावणाऱ्या नागरिकांना केव्हा समज येणार?… हा प्रश्न सुद्धा नागरिकच विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत असताना नागरिकांनी ही स्मार्ट बनायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. एखादी चुकीची गोष्ट झाली की प्रशासनाकडे बोट दाखवणे कुठेतरी थांबले पाहिजे, आणि नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे. अशा जाहिराती लावणाऱ्यावर त्यावर असणाऱ्या नाव आणि फोन नंबर घेऊन संबंधितावर महावितरण ने कारवाई केली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवी सांगवी येथे साई चौकात असणाऱ्या या रोहित्रास आत मध्ये जर आग लागली तर रोहित्राचा स्फोट झाल्यावरच कळेल. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी भाजी मंडई असल्याने येथे नागरिकांची सततची वर्दळ असते त्यामुळे दुर्दैवाने दुर्घटना घडली तर जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना या अगोदर ही घडल्या आहेत, त्यामुळे ज्यांनी हे फलक लावले ते तातडीने कापडी फलक काढून टाकण्यात यावेत नाहीतर त्यावर कारवाई करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे. महावितरण ने ही ‘येथे जाहिरात लावू नये’ असा फलक सर्व रोहित्रावर लावला पाहिजे.
ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…
जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ : पिंपरी चिंचवड हे आशिया खंडात आणि…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड २४ ऑगस्ट (प्रतिनिधी): जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…