महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील नवीसांगवीतील साई चौकामध्ये भाजी मार्केट येथील रोहित्रला सर्व बाजूंनी जाहिरात फलकाने गिळंकृत केले आहे, यात चूक कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना २४ तास अत्यंत जबाबदारी चे काम असते, मग जाहिरात लावणाऱ्या नागरिकांना केव्हा समज येणार?… हा प्रश्न सुद्धा नागरिकच विचारत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत असताना नागरिकांनी ही स्मार्ट बनायला हवे, मात्र तसे होताना दिसत नाही. एखादी चुकीची गोष्ट झाली की प्रशासनाकडे बोट दाखवणे कुठेतरी थांबले पाहिजे, आणि नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे. अशा जाहिराती लावणाऱ्यावर त्यावर असणाऱ्या नाव आणि फोन नंबर घेऊन संबंधितावर महावितरण ने कारवाई केली पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नवी सांगवी येथे साई चौकात असणाऱ्या या रोहित्रास आत मध्ये जर आग लागली तर रोहित्राचा स्फोट झाल्यावरच कळेल. अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी भाजी मंडई असल्याने येथे नागरिकांची सततची वर्दळ असते त्यामुळे दुर्दैवाने दुर्घटना घडली तर जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटना या अगोदर ही घडल्या आहेत, त्यामुळे ज्यांनी हे फलक लावले ते तातडीने कापडी फलक काढून टाकण्यात यावेत नाहीतर त्यावर कारवाई करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्ते यांनी दिला आहे. महावितरण ने ही ‘येथे जाहिरात लावू नये’ असा फलक सर्व रोहित्रावर लावला पाहिजे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…