मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी राज्यभरात रान उठविले आहे. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे दोनदा आमरण उपोषण करून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडले आहे. राज्यभर दौरा करून त्यांनी मराठा समाजामध्ये जनजागृती केली आहे. मराठा समाजात एकीसाठी आवाहन केले आहे. राज्यात मराठा समाजामधून जरांगे – पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांच्याकडे आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मराठा समाजामधून नाराजी आणि रोष व्यक्त करण्यात येत आहे. भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. येवल्यातील अनेक कार्यलयातून भुजबळांचा फोटो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हटविला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…