मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी राज्यभरात रान उठविले आहे. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे दोनदा आमरण उपोषण करून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडले आहे. राज्यभर दौरा करून त्यांनी मराठा समाजामध्ये जनजागृती केली आहे. मराठा समाजात एकीसाठी आवाहन केले आहे. राज्यात मराठा समाजामधून जरांगे – पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांच्याकडे आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मराठा समाजामधून नाराजी आणि रोष व्यक्त करण्यात येत आहे. भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. येवल्यातील अनेक कार्यलयातून भुजबळांचा फोटो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हटविला आहे.
*महाराष्ट्राच्या #अर्थसंकल्प२०२५ चे ठळक मुद्दे:* *विकसित भारत-विकसित महाराष्ट्र.* महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१० मार्च : महाराष्ट्र…
महाराष्ट्र 4 न्यूज, दि.०८ मार्च : कोणत्याही स्त्रीला तिच स्वातंत्र्य देण, समान वागणुक देण, तिच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ मार्च : जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ८ मार्च - राज्यातील दारिद्र्यरेषेखालील महिला आणि ९ ते १४ वयोगटातील…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या पाण्याच्या टाकीचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते लोकार्पण... : चिंचवड येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या…