मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी राज्यभरात रान उठविले आहे. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे दोनदा आमरण उपोषण करून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडले आहे. राज्यभर दौरा करून त्यांनी मराठा समाजामध्ये जनजागृती केली आहे. मराठा समाजात एकीसाठी आवाहन केले आहे. राज्यात मराठा समाजामधून जरांगे – पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांच्याकडे आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व देण्याचा ठराव करण्यात आला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मराठा समाजामधून नाराजी आणि रोष व्यक्त करण्यात येत आहे. भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. येवल्यातील अनेक कार्यलयातून भुजबळांचा फोटो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हटविला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…