महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ ऑगस्ट) : कांदा प्रश्नावर यशस्वी तोडगा काढल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या प्रश्नावर यशस्वी तोडगा काढण्यात केंद्र सरकारला यश आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी फोनवरून केलेल्या चर्चेनंतर 2410 रुपये प्रति टन दराने कांदा खरेदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आता जपानमधुन आभार मानले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार मानतो. कांद्याच्याबाबत जो प्रश्न निर्माण झाला, आणि कांद्यावर निर्यात शुल्क लावल्यामुळे महाराष्ट्रासारख्या कांदा उत्पादक राज्यात एक जो संभ्रम तयार झाला होता. तो दुर करण्याचं काम हे केंद्र सरकारने केलं. तात्काळ निर्णय घेऊन कांदा हा केंद्र सरकार एजन्सिसच्यामार्फत खरेदी करणार आहे. आणि 2410 रुपये प्रति टन त्याचा भाव देखील निश्चित करण्यात आलेला आहे. यामुळे मला विश्वास आहे की, निश्चित शेतकऱ्यांना दिलासा मिळेत.” असं फडणवीस म्हणले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल : 16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…
आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…