Categories: Uncategorized

कर्नाटकात राहुल गांधी हिरो !काँग्रेसने भाजप आणि जेडीएसचे तोंड केले बंद …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. येथे 10 मे रोजी 224 जागांसाठी 2,615 उमेदवारांना 5.13 कोटी मतदारांनी मतदान केले. आज (13 मे रोजी) निवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाला 136 हून अधिक जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे.

र्नाटकात किंगमेकरची भूमिकेत असलेल्यांचं दुकान बंद झालं आहे. कर्नाटकने काँग्रेसला पूर्ण बहूमत दिलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहेत. तर  भाजपने  65 जागा जिंकल्या आहेत तर किंगमेकरच्या भूमिकेत असलेला जेडीएस 19 जागांवर विजय  मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेस भाजप आणि जेडीएसचे देखील तोंड बंद केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेमुळे विजयाचे शिल्पकार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या विजयात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विसरून चालणार नाहीये.

भाजपला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला मिळवून दिलेल्या या विजयामागे पक्षाच्या 2 दक्षिण भारतीय राजकारण्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. एक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि दुसरे काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार.

महत्वाचे म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे यांची गेल्या वर्षीच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. खर्गे काँग्रेस अध्यक्ष बनल्याने कर्नाटकात पक्षाला संजीवनी मिळाल्याचं पाहायला मिळालं. खर्गे हे 9 वेळा कर्नाटकचे आमदार राहिले असून त्यांचा येथील राजकारणात विशेष प्रभाव आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण पक्षाने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि पक्षाने कर्नाटकात सत्ता काबीज केली आहे. खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसला दुसऱ्या राज्यात सत्ता मिळाली आहे.

▶️जुन्या व स्थानिक निष्ठावंत नेत्यांना डावलल्याचा भाजपला फटका?;

जुन्या निष्ठावंत स्थानिक नेत्यांना डावलल्याचा किंवा त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बसल्याचे दिसून येत आहे.आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीही हा इशारा असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला यातून धडा घ्यावा लागणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

2 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago