महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ डिसेंबर) : महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड आमच्या मित्रपक्षाला पूर्णपणे सोडून दिला नाही, असा सूचक इशारा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. जवळपास अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकर सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधले होते. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना विधानसभा निवडणूक जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो.
आगामी महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, नाही आले, तर आम्ही स्वबळावर आणि पक्ष संघटनेच्या जीवावर काम करु, असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते.
“शंभर टक्के लढू किंवा 70-80 टक्के लढू, आज काही भाकित करणं उचित ठरणार नाही, कारण प्रभागाच्या रचना कशा होत आहेत, कसे उमेदवार आहेत, कारण काही काम करणारे उमेदवार आमच्या डोळ्यासमोर आहेत, पण तिथे आरक्षण पडलं, तर काय याचा विचार करावा लागेल” असंही सचिन अहिर म्हणाले.
“सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या बाबत दिलेला निर्णय धक्कादायक म्हणावा लागेल, कारण तो स्थगित करुन नवीन निवडणूक घ्यायला सांगितलं आहे, असं होत नाही काही वेळा. नगरपालिकेच्या निवडणुका वेळेवर होतील, की त्याही स्थगित होतील, हाही प्रश्न आमच्यासमोर आहे” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…