महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ ऑगस्ट) : वरुणराजाच्या कृपेने मावळ तालुका तसेच पिंपरी चिंचवडकराची तहान भागवणारे पवना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. ‘पवना धरण’ हे मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागाला पाणी पुरवठा करणारे महत्वाचे धरण असून, त्यामुळे येथील परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. तसेच धरण आता १०० % भरले आहे.
गेल्या आठवड्यात मावळात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने पवना धरण काल (दि.२१) ९९.१४ टक्के भरले होते तर आज पातळीत वाढ होऊन ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरण १०० टक्के भरले आहे. यावर्षी १ जून पासून आजपर्यंत एकूण २,१६२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह मावळमधील काही भागांचा तसेच एमआयडीसीच्या वर्षभराचा पाण्याची चिंता मिटली आहे.
मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी वाढत आहे .
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…
: आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने नागरी वस्तीत तारांबळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे २०२५ – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० मे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीच्या अंतिम निकालात…