Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : केवळ 35 ते 45 वयोगटातील नागरिकांचं होणार लसीकरण … राज्य सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत आणि उपाययोजनांबाबत नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली आहे. जोपर्यंच मुबलक प्रमाणात लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत 18 ते 45 वयोगटातील सर्वांना सर्रास लस देणं शक्य नसल्यास त्यांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर वयोगटानुसार स्लॉट देण्याचा विचार सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

याबाबत आज दीड वाजतापासून मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली जात आहे. यात 35 ते 44 या वयोगटातील लोकांना आणि विशेषतः इतर आजारांनी ग्रासलेल्या नागरिकांना प्राधान्यानं लस देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Google Ad

18 ते ४४ या वयोगटातील लोकांसाठी केवळ ७ लाख ७९ हजारच लसी उपलब्ध झाल्यानं लसीकरण संथ गतीनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अधिक लसी उपलब्ध होताच गती वाढवण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ४५ वर्षावरील लोकांसाठी ९ लाख व्हॅक्सिन मिळाल्या. त्याचं वाटप झालं आणि ८ लाख लसींचा वापरही झाला. आता काही हजारच लसी ४५ वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी शिल्लक आहेत.

यासंदर्भात केंद्राला वारंवार पत्र लिहित आहोत. केंद्रानं दबाबदारी घेतलेल्या ४५ वर्षावरील व्यक्तींसाठी तरी लस उपलब्ध करुन द्या, अशी मागणी टोपे यांनी केली.
टोपे म्हणाले, ४५ वर्षावरील व्यक्तींमध्ये की ४ ते ५ लाख लोकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणं बाकी आहे. साठ दिवसाच्या आत हा डोस देणं गरजेचं आहे. केंद्र सरकारनं यासाठी लवकर मदत करावी, अन्यथा पहिल्या डोसचा प्रभावही होणार नाही

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!