महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२ ऑक्टोबर २०२१) : अहिंसेचा संदेश व शिकवण सर्वाना देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि साधी राहणी, नम्रता तसेच दृढ विश्वास असे अलौकिक व्यक्तिमत्व लाभलेले भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांचा वारसा भावी पिढीने जोपासावा असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
105 Comments