महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ जुलै) : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ रविवारी रात्री दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तिन्ही लेन बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहाटे अडीचपर्यंत दरड हटविण्यात आली होती.
त्यानंतर दोन लेन सुरू करण्यात आल्या होत्या. तर एक लेन अजुनही बंद आहे. मात्र आता दुपारी दोन तास मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांची अडचण झाली आहे. त्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नोकरदार वर्गाची पंचाईत झाली आहे.
दुपारी १२ ते २ या वेळी महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत रस्त्यावरील दरड हटविण्यात येणार आहे. दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगाला लागल्या होत्या. आता दोन लेन सुरू असल्या तरी मोठ्या प्रमाणात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…
: आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची पोलीस व महापालिका प्रशासनाकडून पाहणी : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे : यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने नागरी वस्तीत तारांबळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ मे २०२५ – पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० मे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीच्या अंतिम निकालात…