Categories: Uncategorized

Pune : पुण्यातील या रस्त्यावरुन मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५एप्रिल) : पुण्याच्या मधोमध असलेली ही वेताळ टेकडी निसर्गसंपन्न आहे. पुण्यातील वेताळ टेकडी फोडून कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा पुणे महापालिकेचा विचार आहे. यामुळे या तिन्ही भागातील वाहतूककोंडी कमी होण्यास आणि प्रवासाचं अंतर कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.  पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिलेला असताना भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र या प्रकल्पाला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

एकीकडे पुण्यात सिमेंटचे जंगल उभं राहीलं असताना या टेकडीवर हजारो झाडं आणि त्यावर अधिवास करणारे मोर, लांडोर, पोपट यासारख्या पक्षांमुळे खरंखुरं जंगल टिकून आहे.  मात्र आता ही टेकडी फोडून पुण्यातील कोथरुड – पाषाण आणि सेनापती बापट रस्ता अशा तीन परिसरांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर करण्यात आला आहे.  हे बोगदे झाल्यास पुण्याचा दक्षिण भाग आणि पुण्याचा उत्तर भाग यादरम्यान प्रवासाचे अंतर कमी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुण्यातील कोथरुड- पाषाण आणि सेनापती बापट रस्ता यांना जोडणारे बोगदे झाले तर वाहतूक कोंडी कमी होईल.

प्रवासाचा वेळ वाचेल आणि अंतर दोन ते अडीच किलोमीटरने कमी होईल. या प्रकल्पामुळे झाडे नष्ट होणार आहेत हे चुकीचं आहे. यामध्ये मेधा कुलकर्णी यांच्यासह देखील अनेक माणसं आहेत.  त्यांना त्यांची मतं आहेत. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू  ऐकले तर ठिक आहे नाही तर ठरवू, असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

मात्र या प्रकल्पला भाजपच्याच माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह तीनही भागातील नागरिक विरोध करतायत.  हे बोगदे झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार नसून वाढू शकते, असं मेधा कुलकर्ण यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पाबाबत आपल्याला व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यासोबतच या प्रकल्पामुळे पर्यावरणाची आणि तीन हजार झाडांची हानी होणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

हे बोगदे झाल्यास या टेकडीवरील तीन हजार झाडे हटवावी लागणार आहेत.  या टेकडीच्या भोवताली असलेल्या जैववैविध्य्यावर त्याचा परिणाम होणार असल्याचं पर्यावरण प्रेमींच म्हणणंय. जमिनीखालील पाण्याचे साठे यामुळे नष्ट होतील असा दावा हे पर्यावरण प्रेमी करत आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत साडे तीन किलोमीटर अंतराचे तीन बोगदे तयार केले जाणार असून त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये खर्च येणार आहे. मात्र या आधी पुण्यातील विकासकामांचा अनुभव पाहता वाहतूककोंडी कमी करण्यासाठी याचा खरंच उपयोग होईल का? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे

Maharashtra14 News

Recent Posts

द न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…

4 days ago

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकांच्या हक्काच्या घराचा “सदनिका हस्तांतरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…

1 week ago

सावधान ! आता… पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर

सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…

1 week ago

मा.अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच् डी प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेंतर्गत अर्थशास्त्र विषयातील…

2 weeks ago

बारामती येथे कर्करोग मोबाईल व्हॅन व डिजिटल हेंड हेड एक्सरे मशीनचे राज्य सभा सदस्य खा.सौ. सूनेत्रा ताई पवार यांचे हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : आज दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी महिला रुग्णालय बारामती येथे…

2 weeks ago

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सांगवी येथे आमदार चषक २०२५” उद्घाटन समारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात…

2 weeks ago