महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जुलै) : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. विधान परिषदेत शुक्रवारी उद्योगमंत्र्यांनी ही घोषणा केली. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर ‘उद्योगरत्न’ पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे.
याशिवाय तरुण उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजकाला असे तीन पुरस्कार देण्यात येतील. अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ फेब्रुवारी : इंडियन मेडीकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखा (IMA PCB)…