Categories: Editor Choice

जुनी सांगवी येथिल अभिनव नगर येथे अनेक दिवसापासून नागरिकांच्या घरात नळाद्वारे ड्रेनेजचे मलमिश्रित दूषित पाणी पुरवठा … नागरिकांचे आरोग्य धोक्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जानेवारी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. शहरातील जुनी सांगवी येथिल अभिनव नगर येथे अनेक दिवसापासून नागरिकांच्या घरात नळाद्वारे ड्रेनेजचे मलमिश्रित दूषित पाणी पुरवठा होत आहे .त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.

चार दिवसापासून नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अतिशय वाईट परिस्थिती आहे. या अगोदरही एप्रिल महिण्यात अशीच परस्थिती होती पुन्हा तिच परस्थिती झाली आहे. असे येथील नागरिक सांगतात. उत्कृष्ठ मोठ्या अशा सोसायट्यामधिल चारदिवस झाले हे दूषित पिल्यामुळे बऱ्याच घरातील पुर्ण कुंटूब लहान मुलांनपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यत आजारी पडले आहेत.

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने अभिनव नगर येथिल पाणी पुरवठा २४ बाय ७ प्रेाजेक्ट पिव्हिसी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. परंतु नागरीकांना होणाऱ्या दूषित पाण्यामुळे असे वाटते की, फक्त कररूपी नागरिकांचे पैसे खर्च झालेत पण नागरिकांचे प्रश्न मात्र अद्यापही सुटले नाहीत.

या भागात होणाऱ्या दुशीत पाण्यामुळे या भागातील नागरिकांना अतिशय नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी परिस्थिती असतानाही  पाणी पुरवठा विभाग अद्यापही कुठलेही ठोस निर्णय घेत नाही व कामाला कोणतीही सुरवात केलेले दिसून येत नाही.

आजच मनसेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका “ह” प्रभाग पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. मनसेच्या वतीने या निवेदनाद्वारे सुचित करण्यात आले आहे की कोणती वाट न पाहता युध्दपातळीवर त्वरित कामाला सुरवात करावी व नागरिकांना होणारा त्रास दुर करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे राजू दत्तू सावळे
पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांनी ‘महाराष्ट्र 14 न्यूज’ शी बोलताना सांगितले.

आमच्या घरात जुलाब उलटल्याने सर्व कुंटूब आजारी आहेत ट्रिटमेंट चालू आहेत. मनपाचे अधिकारी फ्लश आऊट करून देतो बोलले, या अगोदरही असा त्रास झाला होता त्यावेळी ही फ्लश आऊट करून घाण पाणी काढून दिले होते. आमच्या लाईन मध्ये चार पाच कुटुंबातील नागरीकांना अशा घाण पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हरीश शेट्टी (नागरिक, अभिनव नगर, जुनी सांगवी)

Maharashtra14 News

Recent Posts

धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर … जून संपला; पावसाने मारली दांडी, पिंपरी चिंचवडकरांचा पाणी प्रश्न अधिक गंभीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…

2 weeks ago

सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल उद्योजक ‘सखाराम रेडेकर’ यांना प्रतिष्ठित ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…

3 weeks ago

पाणीपुरवठा विभागाकडून प्रभाग 31 आणि 29 नवी सांगवी- पिंपळे गुरव मधील पाणीपुरवठा वेळेत असा होणार बदल …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

3 weeks ago

पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या पाटबंधारे विभागाकडून पिंपरी चिंचवड महापालिकेला सूचना; कपात आजपासून सुरू

*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…

1 month ago

कचरा नियमांची सक्ती आणि सोसायट्यांवरील दंडात्मक कारवाई तुर्तास रोखा! – आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…

1 month ago

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक! किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…

1 month ago