Google Ad
Editor Choice Travel

Mumbai : राज्यातील जिल्हा अंतर्गत प्रवासाबाबत झाली ही महत्त्वाची घोषणा !

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि०७जून) : राज्य सरकारनं पहिल्या चार श्रेणीतल्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी ई-पासची अट काढून टाकली आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यभरात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पुन्हा धावू लागणार आहेत.

मुंबईत बेस्ट उपक्रमालाही आजपासून पूर्ण आसन क्षमतेनुसार फक्त बसून प्रवास करायच्या अटीवर प्रवासी वाहतूक करायला परवानगी मिळाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बसगाड्या चालवल्या जाणार आहेत. बसमधून प्रवास करताना तोंडावर मास्क लावावा अशी सूचना बेस्ट उपक्रमान केली आहे.

Google Ad

मुंबई मेट्रो सेवेनंही प्रवाशांच्या सोयीसाठी उद्यापासून आपल्या दैनिक फेऱ्या वाढवायच ठरवलं असून गर्दीच्या वेळी दर १० मिनिटांनी तर इतर वेळी दर १५ मिनिटांनी ही सेवा उपलब्ध असेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!