महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मार्च) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला होता. मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत एक समिती नेमण्यात आली असून सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे आम्ही हा संप मागे घेत असल्याचं सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच या संपाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात देखील माहिती दिली.
शिंदे म्हणाले, ”सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर आज बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. या आधी १३ तारखेला देखील मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे सचिव आम्ही बैठक घेतली होती. यानंतर आजही पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानेही प्रतिसाद दिला”.
त्यानंतर संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्य सरकार नेहमी त्यांच्या पाठिशी उभं राहील. स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त करून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल”, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिलं.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…