महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०४ नोव्हेंबर :- राज्यात गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. यावेळी नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली.
त्यानुसार, २ डिसेंबर २०२५ मतदान होणार असून ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. 246 नगरपरिषदा, ४२ नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळं आता राज्यात सगळीकडं राजकीय धुरळा पाहायला मिळणार आहे.
▶️असा असेल कार्यक्रम?
1) नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात – १० नोव्हेंबर २०२५
2) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत – १७ नोव्हेंबर २०२५
3) नामनिर्देशनपत्राची छाननी – १८ नोव्हेंबर २०२५
4) नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपिल नसलेल्या) – २१ नोव्हेंबर २०२५
5) नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत (अपिल असलेल्या) – २५ नोव्हेंबर २०२५
6) निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिम निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी – २६ नोव्हेंबर २०२५
7) मतदानाचा दिवस – २ डिसेंबर २०२५
8) मतमोजणीचा दिवस – ३ डिसेंबर २०२५
9) शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस – १० डिसेंबर २०२५
▶️उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा किती?
उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामध्ये ‘अ’ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी १५ लाख रुपये, सदस्यपदासाठी ५ लाख रुपये. तर ‘ब’ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ११ लाख २५ हजार रुपये आणि सदस्यपदासाठी ३ लाख ५० हजार रुपये. ‘क’ वर्ग नगरपरिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ७ लाख ५० हजार रुपये तर सदस्यपदासाठी २ लाख ५० हजार रुपये इतकी खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसंच नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी ६ लाख रुपये तर सदस्यपदासाठी २ लाख २५ हजार अशी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
▶️मतदारांना किती मत द्यावी लागणार
नगपरिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीनं होणार आहे. यामध्ये एका प्रभागात सर्वसाधारणपणे २ जागा असतात. पण जर आकडा विषम असेल तर एका प्रभागात ३ जागा असतात. त्यामुळं इथं मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागेल. याशिवाय नगरपरिषदेचा एक अध्यक्ष असेल त्यासाठी देखील मतदान करावा लागेल. नगरपंचायतमध्ये १ सदस्य आणि १ अध्यक्ष असल्यानं मतदारांना इथं दोन मत द्यावी लागतील.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.01 जुलै : सध्या पवना धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे, ज्यामुळे…
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न... महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.25 जून : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.…
*सध्या पवना धरणामध्ये केवळ १९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध* *पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जून (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांवर (Bulk Waste…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पुण्याचे माजी…