Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राष्ट्रवादीत हालचालींना वेग … अजितदादा , जयंत पाटील पोहोचले शरद पवारांच्या भेटीला !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७मे) : कोरोनाशी लढा देत असताना महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी वाढल्या आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता राष्ट्रवादीत (NCP) हालचालींना वेग आला आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची लगबग पाहण्यास मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळीच सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले आहे. त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील पोहोचले आहे. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Google Ad

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. सायंकाळी 5.30 ते 6.10 वाजेपर्यंत या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

67 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!